० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी एकाच वेळी सहभागी होणार

पालघर : शिखांचे नववे गुरु आणि “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे परमपूज्य श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कोकण विभागात २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता ऐतिहासिक सामूहिक गीतगायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि जवळपास १.५ लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकाच वेळी सहभागी होणार आहेत.

हा उपक्रम राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.

कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांना केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “या उपक्रमातून नवीन पिढीला राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण मिळेल. प्रत्येक विद्यार्थ्याने या राष्ट्रभक्तीपर उपक्रमात सहभागी व्हावे.”

सामूहिक गायनाची विशेषता

२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता कोकण विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था एकाच वेळी गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी गीत गायन करतील. प्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी गुरुजींच्या जीवनावर आधारित हे गीत सादर केले असून तेच गीत सर्वत्र गायले जाणार आहे.या विशेष उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या संस्थेकडून घेतली जाणार असून, या सामूहिक गायनाची जागतिक विक्रम नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्य शहिदी समागम कार्यक्रम

या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर (सेक्टर २९) येथील ओवे मैदानावर मुख्य शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशभरातून भाविक आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

स्पर्धा परीक्षेचे आयोजन

सामूहिक गायनानंतर श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनकार्यावर आधारित ऐच्छिक स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना गुरुजींच्या शौर्य, बलिदान आणि धर्मनिरपेक्षतेच्या संदेशाची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या परीक्षेत सहभागी व्हावे, असेही आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

काटेकोर नियोजन

थेट प्रक्षेपणाची व्यवस्था

या कार्यक्रमाचे कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमधून संबंधित जिल्हा माहिती कार्यालयांकडून सोशल मीडियाद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश