पालघर जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांचा थेट संवाद

४४५ अर्जांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश; नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार : दिनांक : 8 मे 2026

पालघर |(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):-
नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विविध प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या या जनता दरबारात तब्बल ४४५ अर्ज प्राप्त झाले असून, जिल्हा प्रशासनावरील नागरिकांचा वाढता विश्वास या माध्यमातून अधोरेखित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार : दिनांक : 8 मे 2026