“आमच्यासारखे वागू नका” फलकांसह गाढवांचा तहसीलवर मोर्चा

शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा एल्गार; सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने

आंदोलनातील अनोखा संदेश :

“आमच्यासारखे वागू नका” असे फलक गाढवांवर लावून करण्यात आलेले आंदोलन हे मोर्चाचे मुख्य आकर्षण ठरले. शेतकऱ्यांशी होत असलेल्या दुर्लक्षाचा आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा प्रतीकात्मक संदेश देण्यात आला. या अनोख्या आंदोलनाची तालुकाभर चर्चा रंगली.