मोखाडा :-जोरदार वादळी पावसाने घानवळ गावातील आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त- (प्रतिनिधी: अशोक मालक)

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार : दिनांक : 8 मे 2026

घरावरील पत्रे उडून संसार मोकळ्या आकाशाखाली; प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

मोखाडा |(प्रतिनिधी ! अशोक मालक):-

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात आज दुपारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने एका गरीब आदिवासी कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. ग्रुप ग्रामपंचायत हिरवे-घानवळ अंतर्गत येणाऱ्या घानवळ गावातील रहिवासी रामजी जानू नडगे यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे वादळाच्या तडाख्याने उडून गेल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कुटुंबाचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून त्यांच्यासमोर निवाऱ्यासह उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.