Breaking
ई-पेपरकृषीवार्तादेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : येडशी (धाराशिव):⇔”लातुर-बार्शी” महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य;राष्ट्रीय राज्य महामार्गचा दरिद्री कारभार,’शासनाचा निधी कोणाच्या घशात’ सामान्य नागरिकांचा प्रश्न-(प्रतिनिधी:सुभान शेख)

β : येडशी (धाराशिव):⇔"लातुर-बार्शी" महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य;राष्ट्रीय राज्य महामार्गचा दरिद्री कारभार,'शासनाचा निधी कोणाच्या घशात'सामान्य नागरिकांचा प्रश्न-(प्रतिनिधी:सुभान शेख)

0 1 5 5 3 8

“लातुर – बार्शी “ महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य ; राष्ट्रीय राज्य महामार्गचा दरिद्री कारभार,’शासनाचा निधी कोणाच्या घशात’ सामान्य नागरिकांचा प्रश्न 

β : येडशी (धाराशिव):⇔"लातुर-बार्शी" महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य;राष्ट्रीय राज्य महामार्गचा दरिद्री कारभार,शासना निधी कोणाच्या घशात:सामान्य नागरिकांचा प्रश्न-(प्रतिनिधी:सुभान शेख)
β : येडशी (धाराशिव):⇔”लातुर-बार्शी” महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य;राष्ट्रीय राज्य महामार्गचा दरिद्री कारभार,शासनाचा निधी कोणाच्या घशात:सामान्य नागरिकांचा प्रश्न-(प्रतिनिधी:सुभान शेख)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 19  जुलै 2024  

β⇔येडशी (धाराशिव), ता.19 (प्रतिनिधी : सुभान शेख ):धाराशिव तालुक्यातील येडशी येथे राष्ट्रीय राज्य महामार्ग “लातूर-बार्शी ” रोडवरील मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे मागील काही वर्षांपूर्वी बुजवले गेले होते, परंतु नित्कृष्ट पद्धतीने काम केल्यामुळे ते पुन्हा पडले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी पातळ डांबर आणि खडी वापरली जाते, ज्यामुळे खड्डे लवकरच उघडतात. फक्त पंधरा दिवसांत किंवा एका महिन्यातच हे खड्डे पुन्हा पडतात.

     यु ट्युब चॅनल ‘दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल’ चे येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी राष्ट्रीय राज्य महामार्ग लातूरच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला होता. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवले, पण कामाची गुणवत्ता कमी होती. लातूर-बार्शी रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी शासनाने अनेक वेळा निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही, काम अपूर्ण राहिले आहे. गुत्तेदारांनी खड्डे बुजवण्याचे काम अपूर्ण ठेवले आहे आणि या अगोदर दिलेल्या निधीचे पूर्ण वापर झाले नाही. शासनाने दिलेला निधी नेमका कुठे गेला याची तपासणी होऊन, दोषी गुत्तेदारांवर कडक कारवाई करावी. येडशीतील लातूर-बार्शी रोडवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. पहाटेच्या वेळी पुण्याहून लातूरकडे जाणाऱ्या बसगाड्या या रस्त्यावरून जातात. खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. सुग्रीव सोलवट खड्ड्यात पडून त्यांच्या हाताला इजा झाली आहे, शैलेश तपसे यांचे पाय निकामी झाले आहेत आणि दता तुपे यांच्या दोन्ही हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेला जबाबदार कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

                राज्य शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन, लातूर-बार्शी रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या निधीची पाहणी करून चौकशीचे आदेश काढावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येडशीतील ग्रामस्थांनी केली आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१० 

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूजची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.                    ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!