Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनोकरीब्रेकिंग

β : नागपूर :⇒ युवावर्गा पुढे जगातील प्रदुषण व युद्धजन्य परिस्थिती रोखण्याचे मोठे आव्हान ! – ( प्रतिनिधी : रमेश कृष्णराव लांजेवार  )

युवावर्गा पुढे जगातील प्रदुषण व युद्धजन्य परिस्थिती रोखण्याचे मोठे आव्हान!

018555

🌍12 ऑगस्ट ,2023 ,आंतरराष्ट्रीय युवा दिवस

  युवावर्गा  पुढे जगातील प्रदुषण व युद्धजन्य  परिस्थिती रोखण्याचे मोठे आव्हान ! “-      लेखक :रमेश कृष्णराव लांजेवार

β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: नाशिक , शनिवार, 12 ऑगस्ट 2023 ::
β⇒नागपूर ,12 ( प्रतिनिधी :रमेश कृष्णराव लांजेवार ):- जगातील संपूर्ण युवकांनी घातक क्षेपणास्त्रे,जैविक हतीयार, प्लास्टिकचा अती वापर व वाढते प्रदुषण याचा कडाडून विरोध करण्याची वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्र संघाने 17 डिसेंबर 1999 ला युवा विश्र्व संम्मेलनाच्या कार्यक्रमात ठरविण्यात आले की प्रत्येक वर्षाच्या “12 ऑगष्टला” युवा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.याप्रमाने पहिल्यांदाच 2000 मध्ये  आंतरराष्ट्रीय युवा दिवसांची सुरूवात करण्यात आली. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवसांचा थीम होती “युवाओं के लिये सुरक्षित स्थान” आणि 2019 मध्ये थीम होता “ट्रांस्फोर्मिंग एज्युकेशन” परंतु 2023 चा थीम “पृथ्वी को बचाने का प्रयास”.हा थीम असायला पाहिजे असे माझे मत आहे.कारण वैश्विक महामारी आणि पृथ्वीचा होत असलेला ह्रार याला युवा शक्तीच वाचवु शकते. संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे.कारण आजच्या परिस्थितीत पृथ्वीतलावर “जगात युध्दजन्य परीस्थितीत दिसून येत आहे.
        आज प्रत्येक देश एक-मेकावर वरचढ होण्याचा प्रयत्न करीत आहे.याचे जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या 17 महिन्यांपासून सुरू असलेले युक्रेन -रशिया युद्ध व तैवान -चीन संघर्ष यात प्रगती तर नाहीच परंतु विनाश अटळ आहे.चीनचे राष्ट्राध्यक्ष शि.जिंपिंग यांनी वुहानमध्ये कोरोणा व्हायरस तयार केला आणि याला संपूर्ण जगात पसरविण्याचे काम सुध्दा चीनने केले.यात लाखोंच्या संख्येने जिवीत हानी सुध्दा झाली व करोडोंच्या संख्येने संक्रमीत झाले होते.अमेरीकेने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 6 ऑगस्ट 1945 साली सकाळी 8 वाजुन 15 मि. हिरोशिमा-नागासाकीवर परमाणु बॉम्ब टाकला होता याचे मुख्य कारण तानाशहा हिटलर यांची क्रूरता  समाप्त करने होती.परंतु याचे प्रायचीत्य जापानला भोगावे लागले.यात लाखोंची जीवीत हानीसुध्दा झाली.दिनांक 6 ऑगस्ट या घटनेला 78 वर्षे पूर्ण झाली. परंतु चीनच्या विस्तारवादी नितीला रोखण्यासाठी अमेरीकेसह नाटोसेनेने चायना सी मध्ये चिनला घेरून ठेवले आहे.सोबतच चीन तैवानला नेहमीच युध्दासाठी उकसवीण्याचे काम करीत असतो. परंतु आता जर युद्ध झाले तर “तिसरे महायुध्द” अटळ आहे.कारण सध्याच्या परिस्थितीत रशिया-युक्रेन-अमेरीका-नाटो-चीन एकमेकांचे कट्टर दुष्मण झाले असून कोण केव्हा कोणावर महाविणाशक प्रहार करेल हे सांगता येत नाही व यामुळे अनर्थ होऊ शकतो यालाही नाकारता येत नाही.याला युवावर्गानी कोठेतरी रोखले पाहिजे.कारण चीनने सुपरपावर बनण्यासाठी संपूर्ण हद्द पार केलेल्या आहेत.जगातील कोणत्याही देशाचा युवक असो त्याने पशु-पक्षी व मनुष्य प्राणी यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा पध्दतीचे कार्य अंगीकारले पाहिजे.याकरीता चीनच्या युवकांनी शि.जिंनपिंग यांच्या विनाशकारी बायोवेपन्सचा कडाडून विरोध करून चांगला धडा शिकवला पाहिजे.आज संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे.मानवजातीचा पृथ्वीतलावर जन्म जनकल्याणासाठी व विकासासाठी झाला आहे.त्यामुळे आजच्या युवकांनी जगाला कोणत्याही परीस्थितीत विनाशापासुन रोखलेच पाहिजे. अन्यथा अनर्थ होऊ शकतो याला नाकारता येत नाही. जर्मनीचा तानाशहा हिटलर यांची कल्पना”विस्तारवादाची”होती.परंतु त्याचे प्रायचित्य “हिरोशिमा-नागासाकीच्या”स्वरूपात “जापानला”भोगावे लागले. याची पुनरावृत्ती चीन व चीनच्या मित्रराष्ट्रामध्ये होवु शकते याला नाकारता येणार नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शि.जिनपिंग त्याचे विस्तारवादाचे प्रायचीत्य चीनला व त्यांच्या मित्रराष्ट्रांना भोगावे लागेल.त्यामुळे जगातील युवकांनी या युध्दजन्य परीस्थितीला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आवाज उठवीण्याची गरज आहे. करोना काळाच्या कठीण प्रसंगाने युवकांच्या रोजगारावर मोठे संकटाचे बादल निर्माण झाले होते.यामुळे संपुर्ण जगात मंदीचा काळ ओढवला आहे, अनेकांची घरे उजाडली आहे, उपासमारी,भुकमरी, बेरोजगारी, महागाई अशा कठीण प्रसंगांना युवकांना व सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागत आहे.आजचा युवावर्ग फीजीकली कमजोर असला तरी “बुध्दीच्या” बाबतीत तर्बेज आणि ताकदवर आहे.त्यामुळे आज कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी बुध्दीचा योग्य वापर करण्याची वेळ युवकांवर आली आहे.कारण युवाशक्ती “भविष्याची पुंजी” आहे.याची जोपासना करण्याचे काम अनुभवी पीढीने युवकांना मदत करून केले पाहिजे.
                              आज संपूर्ण जगात निसर्गाचा ह्रास होत असल्याने मानवजाती भयभीत आहे.त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक देशांनी आपल्या वर्चस्वासाठी मोठ्या प्रमाणात दारुगोळा, घातक क्षेपणास्त्रे व परमानु बॉम्ब बनवीले आहे.म्हणजेच आज संपूर्ण पृथ्वी “बारुदच्या ढीगाऱ्यावर” बसली आहे.त्यामुळे प्रत्येक देश विनाशाकडे वाटचाल करतांना दिसत आहे.परंतु विध्वंसकारी व विनाशकारी प्रवृत्तीला युवावर्ग रोखु शकते. प्रत्येक देशाच्या युवकांनी शांतीचा मार्ग स्वीकारण्याचे ठाणले तर प्रत्येक देशाचे राष्ट्राध्यक्ष व राजकीय पुढारी युवकांच्या मार्गाला चालना देवु शकते.आपण हिरोशिमा-नागासिकाचा विनाश पहाला, 4ऑगष्ट 2020 ला “लेबनॉनची राजधानी बेरुत”त्यांची पुनरावृत्ती आपण पहाली हा धमाका हिरोशिमा-नागासिकापेक्षा भयानक असल्याचे सांगण्यात येते, युक्रेन -रशिया युध्दामुळे युक्रेन 100 वर्षे मागे गेला आहे, पाकिस्तान आतंकवाद्यांनी भरभटला आहे त्यामुळे तो नेहमीच रक्ताच्या लाथोळ्या दिसतो,चीन-तैवानमध्ये युध्दाची ठीणगी केव्हाही उडु शकते.म्हणजेच कोणताही दारूगोळा असो त्याचा फक्त एकच मार्ग असतो तो म्हणजे “विनाश”. त्यामुळे जागतिक विनाशाला युवकांनी कोठेतरी रोखलेच पाहिजे अन्यथा अनर्थ होवु शकतो याला नाकारता येत नाही.सध्याच्या परीस्थितीत युवा शक्ती ही “जगाची ठेव” आहे.त्यामुळे सर्वांनीच युवकांना सहकार्य करून जी काही “चीनकडून विनाशाची वाटचाल” सुरू आहे तीलाही ताबडतोब रोखण्याची नीतांत गरज आहे.हे कार्य युवकांच्या शक्तीनेच सफल होवु शकते.युवावर्ग सर्वच क्षेत्रात आमूलाग्र प्रगती करीत आहे यात दुमत नाही.परंतु शि.जिनपिंग व उत्तर कोरियाचा तानाशहा कींग्म जॉन उन सारखे जगाला विनाशाकडे नेत आहे.यांच्यावर नियंत्रण लावने अती आवश्यक आहे. संपूर्ण जगातील युवावर्ग, शिक्षणामध्ये व खेळांमध्ये अग्रेसर आहेत.भारतातील युवावर्ग राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय खेळांमध्ये अग्रगण्य भुमिका बजावुन देशाची मान उंचावून सन्मानजनक स्थितीमध्ये आहे.याचे संपूर्ण श्रेय युवकांना जाते.देशाचा युवा म्हणजे भारताची आन-बाण-शान आहे.आंतराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवकांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष देवून जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प केला पाहिजे.यामुळे पृथ्वीचे संतुलन स्थीर रहाण्यास मोठी मदत होईल.                   
                                                                                                                 लेखक : रमेश कृष्णराव लांजेवार,                                                                                     ( माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर मो.नं.9921690779, नागपूर)

(टीप -लेखकाच्या विचाराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही ,हे विचार स्वतंत्र लेखकाचे आहेत.)

β⇒  दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: मुख्य संपादक :: डॉ. भागवत महाले,
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज

                

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
03:51